शेतकर्‍यांना कार्यशाळेत दिले कृषितंत्राचे धडे

लेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या ब्लॉगवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून  मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. ब्लॉगवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा
''माझी वाङ्मयशेती - माझा ब्लॉग''वर वाचा
कविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......

YFPCL


युगात्मा शरद जोशी फार्मर्स प्रोड्यूसर कं. लि. अधिक माहितीसाठी 
   http://yugatma.sharadjoshi.in/    
येथे भेट द्या.
गंगाधर मुटे's picture
Krishijagat: 
नवे तंत्र

शेतकर्‍यांना कार्यशाळेत दिले कृषितंत्राचे धडे

तज्ज्ञांचे मार्गदर्शन : आधुनिक तंत्रावर चर्चा

लोकमत - दिनांक १९/०५/२२२०१५

समुद्रपूर : आपुलकी या सामाजिक संस्थाद्वारा शेतकरी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी आधुनिक कृषीतंत्राची माहिती जाणुन घेतली. कार्यशाळेचे उद््घाटन आ. समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आपुलकी संस्थेचे अध्यक्ष अभिजित फाळके, श्रीकांत झोरे, रामेश्‍वर बरडे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेतील विविध सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते.
यावेळी झालेल्या सत्रात 'शेतीविषयी बोलू काही' या विषयावर मार्गदर्शन करताना सचिन मालकर यांनी शेतकर्‍यांना शेती करताना येणार्‍या अडचणी व त्यावर मात करून शेती योग्य पद्धतीने कशाप्रकारे करता येईल याची माहिती दिली. तसेच डॉ. एल.बी. कलंत्री यांच्या मार्गदर्शनात 'रेशीम शेती आणि शेतीपूरक उद्योग' या विषयावर शेतकरी बांधवांसोबत चर्चा केली. रेशीम शेती करून शेतकर्‍यांनी आपले जीवनमान कसे उंचवावे व व्यवसाय करताना येणार्‍या अडचणींवर मात कशी करायची, यातून शेतकर्‍यांनी नव्या संधी कशा शोधाव्या याबद्दल मार्गदर्शन केले. तर पी.एस. देशमुख यांनी शेतीमालावर प्रक्रिया करून उद्योग करण्याबाबत मार्गदर्शन केले.
समारोपीय कार्यक्रमाला शेतकरी नेते विजय जावंधिया, शेतकरी संघटनेचे गंगाधर मुटे यांची उपस्थिती होती. जावंधिया यांनी शेतकर्‍यांचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्रित येण्याची गरज व्यक्त केली. शेती करताना येणार्‍या अडचणीवर मात करण्याबाबत मार्गदर्शन केले. गंगाधर मुटे यांनी विचार मांडले. अभिजित फाळके यांनी कृषीतंत्राची माहिती दिली.
यावेळी संजय लोहकरे, सतीश नेवारे, भारत बापूराव कामडी यांच्यासह आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)

Apulki

******************

Apulki

******************

Apulki

******************

Apulki

******************