माझी वांगमयशेती घाट्यात गेली पण माझ्या वाङ्मयशेतीशेतीला चांगले भाव मिळत आहेत.
काव्यधारा
कविता
अभंग
धाडा तुकोराया । विठूला सांगावा । मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥
नासले सकळ । तन मन धन । मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥
विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे । अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥
विव्देषाचा डोंब । कैसा परतावा । स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥
वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी । सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥
नाही उपवासी । नाही एकादशी ।
वाचकांच्या भेटी